कसारा येथील वनविभागाच्या जागेवर महावितरणचा ताबा झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
शहापूर प्रतिनिधी सुरेखा पवार : कसारा-शहापूर तालुक्यातील विहिगाव कसारा वनविभागाच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून विना परवानगी उभारण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना काल शनिवारी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. स्थानिक मंडळींच्या चर्चेतून निघालेल्या ३/२ च्या प्रस्तावाच्या मुद्द्यावर अतिक्रमणित जागेवरील विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) व लोखंडी पोल हटविण्यास तूर्तास तरी स्थगिती देण्यात आली आहे. धनविभागाच्या परवानगीशिवाय टिचभरही वनजमीन वापरता येत नाही, परंतु विहिपाय(कमारा)वनविभागाच्या वनक्षेत्रातील नियतक्षेत्र मोखावणे सर्वे नंबर ३४१ जागेवर बीज
वितरण कंपनीने नेमून दिलेल्या ठेका कंपनीकडून अनधिकृतरित्या विद्युत रोहित्र व लोखंडी विद्युत पोल उभे करण्याचे काम कसारा पशिमेकडील टेकडीवर करण्यात आले आहे.हे बेकायदेशीर अतिक्रमण स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी विज वितरण कंपनीस अतिक्रमण काढून घेण्याचे पत्र काढले. मात्र यावर संबंधित कंपनीकडून कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नसल्याचे पाहून वनविभागाने शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलिस बंदोबस्तासह आपला फौजफाटा घेऊन अतिक्रमणित घटनास्थळ गाठले. याची कुणकुण लागताच महिलांचा मोठा सहभाग असलेल्या नागरिकांनी वनविभाग कर्मचा-यांभोवती गोंधळ घालून विद्युत रोहित्र हटविण्यास विरोध
दर्शवला यामुळे यामुळे वनविभागाची जागा आता अतिक्रमणित व्यानीत अडकून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.जवळपास तीन एकरच्या पट्ट्यातून महावितरण कंपनीने वनजमिनीवर अतिक्रमण केले असून त्या ठिकाणी विजेचे लोखंडी खांब व विद्युत रोहित्र कायमस्वरूपी उभे केले गेले आहे. बनविभागाची जमीन वापरताना बनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. बनविभागाची परवानगी नसताना बीज कंपनीने स्थानिक जनतेच्या मागणीनुसार तीन फेजची लाईन दिली आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांचा विशेषतःमहिला वर्गाचा कडाडून विरोध होता. यावेळी उपस्थित आमदार दौलत दरोडा, वनपरिक्षेत्र अधिकारी उबाळे-पी.एस.गुरचळे, सेना नेते चंद्रकांत जाधव यांच्या मध्यस्थी मुळे सध्या तरी वनाधिकारी व कर्मचारी यांना एक पाऊल मागे घेऊन परतावे लागले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏