मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाशकात जल्लोषात स्वागत
आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं -मंत्री छगन भुजबळ
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, समीना मेमन, सुषमा पगारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद जिल्हाध्यक्ष संतोष डोमे, महापालिकेच्या माजी विरोधीपक्ष नेत्या कविता कर्डक, समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, माजी नगरसेवक हरिष भडांगे, मनोहर कोरडे, संजय खैरनार, मुख्तार शेख, नाना पवार, योगेश कमोद, दिपक वाघ, डॉ.योगेश गोसावी, स्वाती बीडला, महेश भामरे, योगेश निसाळ, शंकर मोकळ, मकरंद सोमंवशी, चिन्मय गाढे, गणेश गायधनी, संदीप गांगुर्डे यांच्यासह यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले की, आमच्यावर सर्वांचं प्रेम आहे. आज शुभदिनी नाशकात आलोय. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांना आनंद होणारचं आहे. आमच्यावर कारवाई सुरु असतांना गेल्या ५ वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मन जळत होतं. आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, कार्यकर्त्यांना खाली पाहावं लागेल, याचं दुःख होतं. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला असल्याचे सांगत असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो, निवडणुकांच्या वेळी थोडं जास्त बोललं जातं. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. आज जसे हार पडतायत, तसे प्रहारही पडलेत. राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. सध्या राजकारणातील लोकांची सहनशक्ती कमी होत चाललीय. मात्र आता लोक हुशार झाली आहे. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे सिद्ध झालंय अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता, आता तो बदलावा लागेल. माध्यमांमुळे आजकाल सर्वांना लगेचचं सर्व कळतय. जनता सब जानती है. असे सांगत केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच नाशिक- मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचं समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालयं नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.